तालुका कृषी अधिकारी जयश्री कदम यांचा निरोप समारंभ संपन्न

तालुका कृषी अधिकारी जयश्री कदम यांचा निरोप समारंभ संपन्न

(प्रतिनिधी दौंड ) :- तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी श्रीमती जयश्री कदम यांची बदली पुणे येथे झाल्याने त्यांचा तालुक्यातील कृषी कर्मचाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, शाल, साडी व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करून निरोप समारंभ नवीन प्रशासकीय इमारत दौंड येथे आयोजित करण्यात आला.
या निरोप समारंभात कदम मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अतिशय चांगले सहकार्य केले. त्यामुळे दौंड तालुक्यातील तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजना पोहोचवता आल्याचे सांगितले तसेच याचमुळे पुणे जिल्ह्यात मग्रारोहयो फळबाग लागवड, महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन योजना, विविध विस्तार योजना, शेतकरी शेतीशाळा, विविध पिकांचे प्रकल्प इ.योजनांचे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून अमलबजावणी करून सर्व योजना मध्ये दौंड तालुका प्रथम क्रमांक वर ठेवण्यात यशस्वी झाल्याचे नमूद केले.
या कार्यक्रमास सर्व मंडळ कृषी अधिकारी, आप्पासाहेब खाडे, स्वप्नील बनकर, दिनेश फडतरे, महेंद्र जगताप इ.उपस्थित होते. तर कृषी परिवाराच्या वतीने पोपट चीपाडे, शीतल मगर, युसुफ तडवी, संध्या आखाडे, अंगद शिंदे, इ.नी आपले मनोगत व्यक्त करताना कदम मॅडमना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या .
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौंड तालुका कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोणकर यांनी केले तर आभार अंगद शिंदे यांनी मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )