मानव संरक्षण समितीच्यावतीने एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाठींबा

फलटण – दि.14 .एस.टी. महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसह व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व एस.टी. आगारातील कर्मचारी बेमुदत संपावर उतरले आहेत. या आंदोलनात मानव संरक्षण समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आले आहे. यावेळी समितीचे महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी श्री.जी.एम. भगत , पश्चिम महाराष्ट्र सह सचिव श्री.अशोक हारे‌, तसेच
फलटण तालुका अध्यक्ष श्री.रवींद्र लिपारे , फलटण तालुका सचिव श्री. राजेश साळुंखे , बारामती तालुका अध्यक्ष शिवाजीराव बिबे, फलटण तालुका कमिटी सदस्य अनिल गवळी व सर्व एस.टी कर्मचारी व पदाधिकारी
उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने एस.टी. महामंडळाचे लवकरात लवकर विलिनीकरण करून द्यावे अशी मागणी एस.टी कर्मचारी करीत आहेत. त्यांच्या आंदोलनास समितीच्या वतीने श्री.जी.म.भगत यांनी जाहीर पाठिंबा असल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *