खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

जिल्हास्तरीय बँकर्स समितीची बैठक संपन्न

पुणे, दि. 14 : जिल्ह्यातील बॅंकांनी खरीप पीक कर्जाचे उद्दिष्ट 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी रिझर्व बँक ऑफ इडिंयाच्या एफआयडीडी चे व्यवस्थापक पियुष गोयल, नाबार्डचे रोहन मोरे, बँक ऑफ महाराष्ट्राच्या उपमहाव्यवस्थापक वीणा राव, जिल्हा अग्रणी बँकेचे श्रीकांत कारेगावकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या (डीआरडीए) प्रकल्प संचालक शालिनी कडूपाटील आणि जिल्हातील विविध बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, बँकांनी शेतकऱ्यांना खरीप कर्जवाटप व विविध सरकारी योजनांच्या कर्ज वाटपासाठी वर्षाच्या सुरूवातीपासूनच काटेकोरपणे नियोजन करावे, जेणेकरून उद्दिष्ट गाठणे शक्य होईल. त्यासाठी शासकीय योजनांबाबतचा विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेण्यात येईल. कोविड काळातही जिल्ह्यातील बॅंकांनी समाधानकारक काम केले असून किसान क्रेडीट कार्ड (पीक कर्ज) खरीपाचे 2358 कोटी 83 लाख वाटप केले आहे. 85 टक्के उद्दिष्ट पूर्ण होणे ही शेतक-यांच्यादृष्टीने समाधानाची बाब आहे. खरीप कर्जवाटपाचे पूर्ण उद्दिष्ट गाठण्यासाठी बँकांनी सुक्ष्म नियोजन करावे, पंतप्रधान स्वनिधी योजनेबाबत 16 सप्टेंबर रोजी शिबीर आयोजित करावे. युवकांना स्वयंरोजगारासाठी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेअंतर्गत स्थानिक पातळी व संस्थामध्ये प्रशिक्षण घेण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील विविध बॅकांच्या प्रतिनिधींनी मागील सहा महिन्याच्या कामकाजाचा आढावा सादर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *