गाडीखेल येथे रब्बी ज्वारी बियाणे वाटप

प्रतिनिधी : राज्य कृषी विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बी ज्वारी प्रकल्प बियाणे वाटप सुरू केले आहे. गाडीखेलवाडी येथे मंडल कृषी अधिकारी, ए.एस.यमगर, सरपंच बाळासाहेब आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीची पेरणी करताना गंधक ४ ग्रॅम (३०० मेश) प्रतिकिलो बियाणे त्यानंतर अॅझेटोबॅक्टर २५ मिली आणि पीएसबी २५ मिली प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करून पेरणी करण्याचे आवाहन केले. पेरणीसाठी बीबीएफ यंत्राचा वापर करावा. जेणेकरून बियाणे आणि खत पेरणीवेळी देणे शक्य होईल आणि पेरणी योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवर होईल. त्याचा फायदा उत्पन्न वाढीसाठी होईल, असे यावेळी सांगण्यात आले. मौजे गाडीखेलवाडी येथे ज्वारी पीक प्रात्यशिक ची माहिती व बियाणे वाटप केले यावेळी कृषी पर्यवेक्षक शिवाजी पवार, तलाठी त्रिभुवन साहेब, कृषि सहाय्यक सोमनाथ वाघचौरे , ग्रामपंचायत सदस्य शरद शेंडे , नानासौ जगताप व इतर शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *