गुणवडी येथील अंगणवाडीत ध्वजारोहण संपन्न

बारामती.(प्रतिनिधी : रियाज पठाण.) भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा अमृतमोहत्सव अतिशय आनंदात १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्याचे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. या प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून बारामती तालुक्यातील गुणवडी येथील अंगणवाडीत संपत बळीराम कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी शिक्षिका निर्मला सांगळे,मदतनीस जयश्री कांबळे, सुपरवायझर यशोदा वाबळे,सेविका आशा वायसे मदतनीस लक्ष्मी शिंदे व चिमुकल्या विद्यार्थ्यांसह गुणवडी ग्रामपंचायत चे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *